Monday, July 25, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


वैदिकांना याची एवढी निकड का?

Posted: 24 Jul 2016 07:09 PM PDT

सिंधु-घग्गर संस्कृती ही वैदिक आर्यांचीच निर्मिती हे सिद्ध करण्यासाठी काय उपद्व्याप चालले आहेत हे पाहिले तर थक्क व्हायला होते. सिंधू संस्कृतीची लिपी वाचल्याचे व ती वैदिक संस्कृती असल्याचे अनेक दावे केले गेले. एन. एस. राजाराम व एन. झा यांनी असाच दावा करत एक ग्रंथही लिहिला. त्यात त्यांनी २००० मुद्रांचे वाचन केल्याचे दाखवत काही मुद्रांवर वैदिक राजा सुदास, यदु, पुरु, कुत्स, राम आदींचा तसेच षडागमांचाही उल्लेख आहे तर बहुसंख्य मुद्रांवर नद्यांचे तर काही ऐहिक सामान्य उल्लेख आहेत असा दावा केला. याच ग्रंथात लेखकद्वयाने सिंधू संस्कृतीला घोडा माहित होता हे दाखवण्यासाठी एका बैलाचे चिन्ह असलेल्या मुद्रेच्या छायाचित्रावर संगणकीय छेडछाड (forgery) केली. ही बनावटगिरी करण्याचे कारण म्हणजे सिंधू संस्कृतीत घोडा असल्याचा एकही पुरावा नव्हता आणि वैदिक आर्यांचे संपुर्ण जीवन तर घोड्यांभोवती फिरते! त्यामुळे सिंधू संस्कृतीत घोड्याचे अस्तित्व होते हे दाखवण्याची त्यांना निकड होती. त्याशिवाय सिंधु संस्कृती वैदिकांची निर्मीती हे कसे सिद्ध करणार?

हे दावे वृत्तपत्रांत व पुस्तक (The Deciphered Indus Script-1999) प्रसिद्ध झाल्यावर जगभर खळबळ उडाली. कारण या शोधाने सिंधू संस्कृतीचा इतिहास नव्याने लिहिणे भाग होते. जगातील एका प्राचीन संस्कृतीची लिपी वाचणे हे असामान्य कार्य होते यात शंका नाही. पण राजाराम आणि झा यांचे दुर्दैव. हार्वर्डचे इंडोलोजिस्ट मायकेल विट्झेल आणि त्यांचे सहयोगी स्टीव्ह फार्मर यांनी झा व राजाराम यांची बदमाशी फ्रंटलाईनमद्ध्ये (आक्टोबर २०००) लेख लिहून उजेडात आनली. या लेखात त्यांनी वैदिकवाद्यांच्या बनावटगिरीवर कठोर टीका केली. राजाराम व झा यांनी मुळच्या तुटलेल्या अर्धवट एकशिंगी बैलाच्या (Unicorn) मुद्रेला संगणकीय आधार घेत पुर्ण करत तो बैल घोडा असल्याचे कसे दाखवले आहे हे त्यांनी पुराव्यानिशी सिद्ध केले. (http://www.frontline.in/static/html/fl1720/17200040.htm या लिंकवर हा लेख उपलब्ध आहे.) यामुळे भारतीय विद्वत्तेची जगभर लाज निघाली.

प्रश्न हा कि सिंधू संस्कृतीचे निर्माते हे वैदिक आर्य हेच होते हे सिद्ध करण्याची निकड वैदिकवाद्यांना का भासते? त्यासाठी बोगस दावे आणि चक्क फोर्ज-याही का केल्या जातात? एतद्देशियांचे (हिंदुंचे) सांस्कृतिक संचित लुबाडत वैदिक सांस्कृतिक स्ववर्चस्वतावाद निर्माण करणे हाच एकमेव उद्देश त्यामागे आहे हेच त्यातून दिसत नाही काय?

Saturday, July 23, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


असे घडले असते तर

Posted: 22 Jul 2016 08:59 PM PDT

जर काही असे घडले असते तर आपण सुसंस्कृत देशाचे नागरिक आहोत हे दिसले असते.

१) १९९० ला काश्मीरी पंडितांचे जे हत्याकांड आणि निर्वासन झाले याबाबत देशभरातील मुस्लिमांनी आक्रोश केला असता....

२) हिंदुंनीच बाबरी मशीद न पाडता न्यायालयीन आदेशाचा सन्मान ठेवला असता.

३) अखलाख प्रकरणात बहुसंख्य लोक त्याच्या बाजुने जसे उभे राहिले तसे मुस्लिमही बहुसंख्येने वेमुला किंवा अन्य कोणत्याही गैरैस्लामी अन्यायाविरुद्ध उभे राहिले असते
.
४) साध्वी ते पार सा-या महंतांची अधार्मिक वक्तव्ये जशी बहुतेकांनी फेटाळली तशीच झाकिरची बेवकुफ वक्तव्ये मुस्लिमांनीच फेटाळली असती.

५) मी वैदिक हे स्वतंत्र धर्माचे आहेत, हिंदुंशी संबंध नाही हे म्हणू शकतो...मी आजही जीवंत आहे....केवळ व्यंगचित्र काढले म्हणून चार्ली हेब्दो प्रकरणी नृशंस हत्याकांड होऊनही किती मुस्लिम निषेध करायला सामोरे आले? जगभरचे आले कि नाही हे सोडून देवू...भारतातील किती आले?

६) भारतातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांना संघ मान्य नाही व ते त्याबाबत बिनधास्त बोलतात. मी तर संघ हिंदुंचा नसून वैदिक धर्मियांचा आहे असे म्हणतो. किती मुस्लिम मिम किंवा भारतातील मुस्लिम तत्वज्ञानकेंद्रीत संघटनांचा जाहीर विरोध करतात?

७) आयसिसबद्दल भारतीय मुस्लिमांची नेमकी काय भुमिका आहे हे किरकोळ प्रतिक्रिया वगळता व्यापकपणे का दिसत नाही?

८) तथाकथित उच्चवर्णीय लोकांच्या वर्चस्वतावादाविरुद्ध महात्मा फुलेंच्या काळापासून जो रोष दिसून येतो तसा रोष अजलाफ मुस्लिमांचा अशरफांबद्दल का दिसून येत नाही? मुस्लिम धर्म चालवनारे अशरफ आहेत कि अजलाफ आहेत? कि दोहोंची मिलीभगत आहे आणि खाजगीत ज्याने त्याने आपली गुलामी स्विकारली आहे?

९) तथाकथित हिंदुंत एक वर्ग आहे जो मुस्लिमांचा द्वेष करतो. संघटनाही आहेत. काही कृतीही केल्या आहेत. पण आम्हीच त्यांच्या विरोधात तुमच्यापेक्षा जास्त रान उठवत असतो. या देशातील मुस्लिम हे भारतीय मुस्लिम आहे यावर मी आणि अगणित कितीतरी श्रद्धा ठेवतात. असंख्य मुस्लिमही अशीच भावना बाळगतात हा माझाही अनुभव आहे. पण राष्ट्रहिताच्या बाबी येतात तेंव्हा इमाम ते सामान्य मुस्लिम कोठे दडी मारतात? कि दारुल हरब नि दारुल इस्लम खाजगीत घट्ट डोक्यात बसला आहे? मग तुमच्या कोणत्याही भुमिकांवर विश्वास कसा ठेवायचा?

१०) संशयाच्या वातावरणात मैत्र होत नसते. भुमिका स्पष्ट तर हव्यातच कृतीतुनही दिसायला हव्यात. धर्मांधांशीचा लढा, हिंदु/वैदिक असोत कि मुस्लिम, जोवर कृतीतुन सिद्ध करत नाहीत तोवर लढला जाणार नाही. तुमची आजवरची या लढ्याबाबतची कृती काय आहे? इतिहासात जायला नको...वर्तमानकाळात काय आहे?

तर हे काही प्रश्न आहेत तर काही विधाने आहेत. मानवजातीला...किमन भारतियांना अमन-सुखात जगायचे असेल तर या विधानांची...प्रश्नांची एकदाची सोय लावावी लागेल. भारतीय घटना स्वतंत्रतावादी आहे. ती महनीय आहे. य स्वातंत्र्याचा उपयोग आम्ही बेवकुफांसारखा करणार असू तर उद्या घटना अंमलात राहीलच असे नाही. कोणाही बेवकुफ धर्मांधाचे सरकार येईल आणि घरोघर अखलाक नाहीतर अन्य कोणे मारला जाईल.

आम्हाला आमचा देश मध्यपुर्व होऊ द्यायचा आहे काय यावर सर्वांनी विचार करावा.

Sunday, July 10, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


गणिताचे गणित!

Posted: 10 Jul 2016 04:35 AM PDT

शास्त्रज्ञ बनण्यासाठी गणितावर प्रभुत्व आवश्यकच आहे हा भ्रम भारतीयांत प्रबळ आहे. अन्यत्रही आहेच. यामुळे अनेक शास्त्राच्या नवनवीन संकल्पना माडू शकण्याची क्षमता असलेले पण गणितात कच्चे असलेले विदयार्थी शास्त्रज्ञ होण्यापासून मुकतात. खरे तर गणित एक भाषा आहे जी शास्त्रीय संकल्पनेची तार्किक परिणती दर्शवते. सोळाव्या शतकापर्यंत आज रुढ असलेल्या गणितीय पद्धती अथवा संकल्पना अस्तित्वातही नव्हत्या. गरजेप्रमाणे त्यांचा विकास होत गेला. पुढेही होत राहील. गणिती भाषेत जे सांगितले जाते ते अंतिम सत्य असते असा दावा शास्त्रज्ञही करत नाहीत.

एके काळी पायथागोरस ने गणितालाच परमेश्वर मानत एक धर्म स्थापन केला होता हे अनेकांना माहित असेलच. गणित हेच परिपुर्ण आहे नि म्हणून ते इश्वर आहे अशी या धर्मामागची श्रद्धा होती. गणित हे संकल्पना अत्यंत काटेकोरपणे मांडण्याचे साधन आहे यात वाद नाही. परंतू संकल्पना आधी मानवी मनात येते, स्वयंप्रेरणांनी ती प्रक्रिया होत विकसित होते. त्यानंतर गणित येते. उलटे होत नसते. नाहीतर प्रत्येक गणिती शास्त्रज्ञ झाला असता.

जगाच्या इतिहासात गणितात कसलेही गम्य नसलेले अनेक लोक सर्व रुढ संकल्पनांना आव्हान देत महान शास्त्रज्ञ झालेले आहेत. डार्विन, लव्हाझिए व लेनोस ही त्याची काही उदाहरणे आहेत. गणिती विचार करण्याची क्षमता आणि गणीत यात फरक करावा लागतो. गणिती विचार करण्यासाठी गणीती आसण्याची गरज नाही. भौतिकविद युजिन विग्नर म्हणतात कि आइंनस्टाईन, फर्मी, बोर, फीनम्यन यांची विचारप्रात्यक्षिके कल्पकतेतून सोडवण्याची क्षमता त्यांच्या गणिती क्षमतेपेक्षा मोठी होती. इ. ओ. विल्सन म्हणतात कि शास्त्रज्ञ हा गणितीची, जेथे गरज आहे तेथे, मदत घेऊ शकतो. त्याला स्वत:ला गणितज्ञ असण्याची गरज नाही. एडिसनचे एक प्रसिद्ध वाक्य आहे, "मी गणिती भाड्याने घेऊ शकतो...गणिती मला नाही."

गणितावरचे प्रमानाबाहेरचे अवलंबित्व शास्त्राच्या काही शाखांचा समाधानकारक विकास होऊ देत नाही. विश्वोत्पत्ती शास्त्र आणि सुक्ष्म स्तरावर घडणा-या भौतिकी घटना, या दोहोंचे उदाहरण येथे घेता येईल. मानवी गणितीय संकल्पना त्या घटनांचे विश्लेशन करण्यात पुरेशा ठरत नाहीत. किंबहुना कोणतीही रुढ गणितीय पद्धत त्यांचे विश्लेशन करू शकत नाही. याचे कारण म्हणजे शेवटी या घटना मानवी मेंदुत काल्पनिक पण तर्कदृष्ट्या संकल्पिल्या गेलेल्या असतात. या संकल्पना आणि प्रत्यक्ष वास्तवे जी प्रयोगातुनही सिद्ध होत नाहीत वा वेगळेच अकल्पनीय, विश्लेशनाच्या पलीकडचे परिणाम दर्शवतात त्यातून काढले जाणारे अन्वयार्थ परिपुर्ण असण्याची शक्यता नाही. ही मानवाची मर्यादा आहे नि म्हणून गणिताचीही आहे. किंबहूना नियम तोडत केला गेलेला विचार/संकल्पना ही क्रांतीकारक असू शकते. गणिताची पर्वा संकल्पकाने करू नये...ती गणिती करतील.

शास्त्रज्ञ इ. ओ. विल्सन म्हणतात, "During my decades of teaching biology at Harvard, I watched sadly as bright undergraduates turned away from the possibility of a scientific career, fearing that, without strong math skills, they would fail. This mistaken assumption has deprived science of an immeasurable amount of sorely needed talent. It has created a hemorrhage of brain power we need to stanch."

अमूक भाषा येत असेल तरच विद्वान, अन्यथा नाही या अशास्त्रीय विचारांच्या प्रभावात भारताने खूप काही गमावले हे आपल्याला माहितच आहे. गणितही एक भाषा आहे. ती आली तर उत्तमच, पण ती येत नसेल तर शास्त्रीय संकल्पना मांडताच येणार नाहीत या भ्रमात रहायचेही कारण नाही. शास्त्र हे मानवी कल्पक/संकल्पक बुद्धीची बटीक असते. त्यासाठी गणित अनिवार्य नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

Saturday, July 2, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


जातिसंस्थेकडे पाहण्याचा नवा दृष्टीकोन

Posted: 02 Jul 2016 02:24 AM PDT

***राघव काळे***
पुस्तकाचे नाव : जातिसंस्थेचा इतिहास
लेखक : संजय सोनवणी
प्रकाशन : प्राजक्त प्रकाशन, पुणे.
मूल्य : 220 रुपये
संपर्क ः 9890956695


भारतीय जातिसंस्थेच्या निर्मितीबाबत अनेक सिध्दान्त आहेत. आक्रमक आर्यांनी एतद्देशियांना हरवून त्यांच्यावर जातिसंस्था लादली, ब्राह्मणांनी स्वार्थासाठी जातिव्यवस्था निर्माण करून मनुस्मृतीद्वारे जातीच्या बेडया कायम केल्या, ते जातिसंस्था आदिम असून ती आधीपासून अन्याय्य व विषमतामूलक होती असे मानणारा विचारप्रवाह एकीकडे आहे, तर जातिसंस्थेचे समर्थन करत वर्णसंस्थेचेच पुढील रूपांतर म्हणजे जातिसंस्था असे मानणाराही एक विचारप्रवाह आहे. या विचारप्रवाहांतील संघर्ष हे हिंदूंच्या समग्र व्यवस्थेतील सध्याच्या सामाजिक कलहांचे कारण बनले आहे. त्यात जातिअंताचे काय, हा प्रश्न चर्चेत असला तरी निरुत्तरित राहतो आहे.
संजय सोनवणी यांचे 'जातिसंस्थेचा इतिहास' हे पुस्तक मात्र वर उल्लेखलेल्या मतप्रवाहांना पुरता छेद देते. धर्म-समाज-अर्थ-मानववंश इत्यादी शास्त्रांची कास धरत त्यांनी जातिसंस्थेच्या उगमाच्या आजवर प्रचलित असलेल्या सर्व सिध्दान्तांना सुरुंग लावत सर्वस्वी नवा सिध्दान्त मांडला आहे व जातिसंस्थेकडे नव्याने पाहण्याची नजर दिली आहे, असे म्हटले तरी वावगे होणार नाही. सोनवणी हे एक बहुजनहितैषी संशोधक लेखक असले, तरी बहुजनवाद्यांच्या मांडणीलाही आव्हान देणारे त्यांचे हे संशोधन आहे. त्याच वेळीस हिंदू समाजात वर्चस्वतावाद जपणाऱ्या काही गटांनाही या पुस्तकामुळे धक्का बसणे स्वाभाविक आहे.
सोनवणी यांनी पुढील सूत्रात या पुस्तकाची मांडणी केली आहे -
  1. माणसाची जसजशी प्रगती झाली, नवे शोध लागले, तसतसे नवे व्यवसाय निर्माण झाले. व्यवसाय म्हणजेच जाती. व्यवसायांचा शोध मुळात मानवी इतिहासात सावकाश व क्रमबध्द रितीने लागला असल्याने जाती आदिम होत्या या मतात कसलेही तथ्य नाही. यासाठी उदाहरणार्थ ते म्हणतात, लोखंडाचाच शोध लागला नाही, तर लोहार कोठून येणार? वस्त्रांचाच शोध लागला नाही, तर विणकर कोठून येणार?
  2. जाती (म्हणजेच व्यवसाय) हे कोणालाही कोणावर लादता येणे शक्य नसून लादणाऱ्यांनीच सारे शोध लावले आणि कोणी कोणते काम करायचे हे ठरवले असे होणे अशक्यप्राय आहे. त्यामुळे जाती कोणी बनवल्या व इतरांवर लादल्या, हे मत समाजेतिहासाच्या आधारावर टिकत नाही.
  3. इतिहासात नवीन जाती जशा निर्माण झाल्या, तशाच व्यवसायच नष्ट झाल्याने अनेक जातीही नष्ट पावल्या. त्या कशा, हेही ते अशा अनेक जातींची ससंदर्भ माहिती देत जातिव्यवस्था अपरिवर्तनीय व बंदिस्त होती हे मत कसे चुकीचे आहे, हे सिध्द करतात.
  4. जातिव्यवस्था अपरिवर्तनीय बनायला दहाव्या शतकानंतरची बदलती राजकीय व आर्थिक स्थिती, श्रेणी व्यवस्थेचा अंत आणि 1022पासून भारतात सर्वत्र लागलेल्या दुष्काळाच्या रांगेला कारण ठरवतात. प्राप्त स्थितीत तरून जायला निर्माण झालेली गावगाडयाची पध्दत विषमतेला धर्मापेक्षाही कशी कारणभूत ठरली, हेही स्पष्ट करतात.
  5. वर्णांना व जातींना एकत्र समजत सामाजिक विश्लेषण केल्याने जाती-वर्णांप्रमाणेच अनादी व अपरिवर्तनीय समजल्या गेल्या, असे स्पष्ट करत सोनवणी एक अत्यंत धाडसी सिध्दान्त मांडतात व तो म्हणजे वर्णव्यवस्था ही वैदिक धर्मातील अंतर्गत व्यवस्था असून जातिव्यवस्था ही अवैदिकांची, म्हणजे वेदपूर्व धर्म पाळत राहणाऱ्या लोकांची व्यवस्था आहे. त्यांच्या मते हे दोन्ही धर्म आजही वेगळे असून वैदिक (म्हणजे जन्मजात वेद व वेदाधिकार असलेले) आणि अवैदिक (म्हणजे त्यांच्या मते हिंदू) हे दोन धर्म एकत्र समजले गेल्याने हा जातीय गोंधळ निर्माण झाला आहे. पाश्चात्त्य विद्वानही वर्ण व जात या दोहोंचा इंग्लिश अनुवाद 'कास्ट' असाच करतात व ते चुकीचे आहे, हे ते दाखवून देतात.
थोडक्यात, जातिसंस्थेचे हे सर्वस्वी नवे आकलन आहे. जातिअंताची दिशाही ते देतात. आपले मुद्दे अधिक स्पष्ट व्हावेत म्हणून जवळपास चौदा जातींचा इतिहासही देतात. अगदी ब्राह्मण या वर्णाचाही इतिहास ते देतात. वैदिक व हिंदू हे दोन धर्म वेगळे आहेत हा त्यांचा सिध्दान्त मात्र वादळी ठरू शकतो. किंबहुना हिंदू धर्माच्या सध्याच्या रचनेला विपरीत तडा देऊ शकतो व भावी प्रगतीच्या मार्गात खीळ घालू शकतो. तो कोणाच्या पचनी पडणे शक्य नाही. वैदिक धर्म व पौराणिक धर्म यांच्या मिश्रणाने आजचा हिंदू धर्म बनला आहे अशी सर्वच विद्वानांची मान्यता असताना सोनवणी वैदिक-अवैदिकतेवर भर देतात, ही या पुस्तकातील मोठी त्रुटी आहे.
असे असले, तरी सोनवणींनी या पुस्तकाद्वारे जातिसंस्थेबाबत असंख्य भ्रम दूर करण्याचे अमोल कार्य केले आहे, यात शंका नाही. खरे तर हे संशोधन खूप पूर्वीच झाले असते व अधिकाधिक लोकांपर्यंत गेले असते, तर आजची जातकलहांची तीव्रता कमी झाली असती असे वाटल्याखेरीज राहवत नाही. समाजातील जातीय द्वेष आणि विखार थांबवायचे असले, तर मुळात जाती बनल्याच कशा हे समजून घेतल्याखेरीज गत्यंतर नाही. अत्यंत सखोलपणे, ठिकठिकाणी संदर्भ देत सोनवणी आपल्याला जातिनिर्मितीच्या प्रवाहात खेचून घेतात. भारताच्या संस्कृतीच्या घडणीत सर्व जातींचे बरोबरीचे योगदान कसे आहे, हेही ते दाखवून देत कोणतीही जात उच्च अथवा कनिष्ठ नाही, हेही ते बरोबर बिंबवतात. यामुळे जाती नष्ट झाल्या नाहीत, तरी सर्व जाती परस्परांचा आदर तरी करतील हा सोनवणींचा आशावाद खरा होऊ शकेल, अशी आशा बाळगायला हरकत नाही.
हे संशोधन करत असतांना सोनवणींनी अनेक विद्याशाखांचा उपयोग केला आहे, याची प्रचिती पुस्तक वाचताना येते. पूर्वसुरींच्या दिग्गजांच्या मतांना खोडून काढण्यात ते अनमान करत नाहीत. पुराव्यांचे बळ असल्याने ते हे सहज करू शकले.
जातिव्यवस्थेसारख्या संवेदनशील विषयांवरील रूढ प्रमेयांना धक्का देणारे, स्वप्रज्ञेने केलेले संशोधन जाहीरपणे मांडण्याएवढा निर्मळ काळ आज नाही. असे असतानाही सोनवणी यांनी अत्यंत तर्कनिष्ठतेने वस्तुनिष्ठ संशोधन करत पुराव्यांसहित ठामपणे आपली मांडणी केली आहे. हे पुस्तक नुसत्या अभ्यासकांसाठी नव्हे, तर चळवळीतील प्रत्येक कार्यकर्ता व सामान्य वाचक यांच्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे.

आधुनिक पेशवे-छत्रपती?

Posted: 01 Jul 2016 07:40 PM PDT



पुर्वी छत्रपती पेशव्यांना वस्त्रे द्यायचे, आता फडणवीस छत्रपतींना वस्त्रे देत आहेत असे विधान शरद पवार यांनी केले. अलीकडे राजकारणी नेते अफजलखान, निजाम, औंरंगजेबाचे सैन्य वगैरे शेलके शब्द विरोधकांना वापरत मराठी राजकारण आजही सरंजामदारी युगात अडकलेले आहे आणि त्याचा उद्धार होणे शक्य नाही याबाबत विश्वास देत आहेत. शरद पवारांनी केलेले विधान उपहासात्मक असो कि "कहीं पे निगाहें...कहीं पे निशाना" या थाटाचे असो, ते जातीवादीच आहे असे बहुसंख्य विश्लेशकांचे मत आहे व वाहिन्यांवरही त्याचे पडसाद उमटले आहेत. कोण किती जातीयवादी आहे हे सांगण्याची मोहिम जोमात आहे.

पेशवे म्हणजे ब्राह्मणच असा दृढ समज असंख्य महाराष्ट्रीयनांचा आहे. खरे तर पेशवे म्हणजे राजातर्फे राजनैतिक पाहूण्यांसमोर प्रथम पेश होणारा सेवक. हा शब्द अभारतीय आहे. फारसी भाषेतून हा शब्द आलेला आहे. हे पद पंतप्रधान पदाचे वाचक नाही. पंतप्रधानाच्या समानार्थी येणारा शब्द म्हणजे "वजीर". पेशवे पद हे तसे अप्रसिद्धच म्हतले पाहिजे, कारण या पदाची सामान्य राजनयिक जबाबदारी. अधिकार अगदी किरकोळ. हे पद वंशपरंपरागत नसे. हे पद शिवाजी महाराजांनी निर्माण केले. शिवकालीन अष्टप्रधानांबद्दल कोणी लोकशाहीच्या बीजारोपणाचे उदाहरण देत असले तरी अष्टप्रधानास विशेषाधिकार नसत. संभाजी महाराजांनी आपल्या हत्येच्या कटात सामील असल्याच्या आरोपावरुन मोरोपंतांना अटकेत टाकले होते व कैदेतच त्यांचा मृत्यू झाला. पुढे काही काळ प्रल्हाद निराजी पेशवे असावेत असा इतिहासकारांचा अंदाज आहे.

पुढे मात्र संभाजी महाराजांनी अटकेतच असलेल्या मोरोपंतांच्या पुत्राला, निळोपंत यास, कैदेतून मुक्त करून पेशवाई दिली. पण त्यामागे कटवाल्यांना अजून संधी मिळु नये, शांतता राखावी हा प्रमुख हेतू होता. अन्य पदे, मुजुमदार (अमात्य), सेनापती वगैरेही वंशपरंपरागत नव्हती.

शाहु महाराजांना सातारच्या गादीवर आणण्यात बाळाजी विश्वनाथाचा वाटा मोठा होता. कोल्हापुर गटाची कारस्थाने बाळाजीने मोडुन तर काढलीच पण आंग्रेंसारखे ताराबाईच्या बाजुला असलेले बलाढ्य सरदारही त्याने शाहुच्या बाजुने शक्ती-युक्तीने उभे केले. प्रसंगी कर्ज तर काढलेच पण एकदा त्याचे अपहरणही झाले होते. त्याने जीवावरची संकटे झेलली. राजसबाईला हाताशी धरुन ताराराणीला शेवटी पन्हाळ्यावर नजर कैदेत ठेवण्यात आले.अशा रितीने शाहुंना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा अधिकृत वारस म्हणुन जनमान्यता व बव्हंशी सरदार मान्यताही लाभली. बाळाजी विश्वनाथ हा शाहुंचा अत्यंत मुत्सद्दी आणि विश्वासु सहकारी बनला तो त्याने शाहुंना केलेल्या अनमोल मदतीने. याचीच परिणती बाळाजील पेशवेपद मिळण्यात झाली.( १७ मे १७१३)  बहुतेक सर्व प्रशासकीय स्वातंत्र्य बाळाजीच्या हवाली करुन सातारा येथे शाहु सुखाने राहु शकले.

बाळाजीनंतर बारामतीच्या नाईकांना पेशवेपद द्यावे या मताचा गट प्रबळ होता. पण शाहू महाराजांनी बाजीरावाला ते पद दिले. बाजीरावाने त्या संधीचे सोने कसे केले ह इतिहास सर्वांनाच माहित आहे. त्यामुळे पेशवेपदाची प्रतिष्ठा वाडली. एवढी कि बाळाजीपासुनच्या पुढच्या काळाला पेशवाई असेच म्हटले जाते. हे सर्व ब्राह्मण होते. याला काही त्यांचा दोष म्हणता येणार नाही. दिली तख्तातही असेच राजकीय फेरफर होत वजीर महत्वाचा बनून बादशहा हे पद अधिकाराच्या दृष्टीने दुय्यम बनले. कारण औरंगजेबानंतरचे बादशहा बव्हंशी अकार्यक्षम होते. तसेच येथील शाहुमहाराजांनंतरच्या छत्रपतींचे झाले. पुढे तर छत्रपती  पदावरील वारसाची निवड करण्यात पेशव्यांनीच भुमिका निभावली.

पेशवे पदाची अप्रतिष्ठा दुस-या बाजीरावाने केली हे सर्वांना माहितच आहे. पेशवेपदाला हपापलेल्या राघोबादादाने तर खून करण्याइतकी मजल गाठली होती. तसे जगाचाच इतिहास राजकीय सत्तापिपासा आणि त्यासाठी केली गेलेली कटकारस्थाने यांनी भरला आहे. मराठेशाहीही त्याला अपवाद नव्हती हे आपल्याला शांतपणे समजावून घ्यावे लागंणार आहे.

भारतात कोणा राजाने छत्रपती ही पदवी धारण केल्याचे उदाहरण नाही. काही अभिषिक्त राजांचे दाखले आपल्याला रामायण महाभारतापासून ते पुराणांत मिळतात. युधिष्ठिर, राम वगैरे सुपरिचित उदाहरणे. राज्याभिषेक अर्थातच दोन प्रकारचा...एक वैदिक व दुसरा तांत्रिक म्हणजे शैव अथवा शाक्त. शिवाजी महाराजांनी दोन्ही प्रकारचे राज्याभिषेक करून घेतले. संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकाची एवढी सखोल माहिती मिळत नाही, त्यामुळे तो वैदिक कि शाक्त हे समजत नसले तरी संभाजीमहाराज स्वत: शाक्त पंथाचे अनुयाये असल्याने तो शाक्त असण्याची शक्यता आहे.

असे असले तरी इतिहासकाळात अथवा पुराणांतरी "छत्रपती" हे  बिरूद कोणी वापरल्याचे दिसत नाही. चक्रवर्ती, राजाधिराज, राजराजेश्वर, राजाधिराज इत्यादी पदव्या पुराणांतरी जशा आहेत तशाच शिलालेख अथवा नाण्यांवरही दिसतात. पण छत्रपती ही पदवी दिसत नाही.

छत्रपती या शब्दाच्या उगमाच्या अनेक व्युत्पत्ती आहेत. त्यातील महत्वाची अशा, आपल्या अनुयायांना छत्रछायेत घेतो तो छत्रपती किंवा छत्र-चामर धारण करायचा अधिकार ज्या व्यक्तीस आहे तो छत्रपती. दुय्यम अर्थ असा कि ठरावीक क्षेत्रावर अधिकार असलेली व्यक्ती म्हणजे क्षेत्रपती-छत्रपती.

शिवाजी व संभाजी महाराजांनी या पदव्या घ्याव्यात हे कोणे सुचवले हे आपल्याला आज माहित नाही. पण महापराक्रमाने, प्रजाहितदर्शी धोरण राबवल्याने छत्रपती म्हटले कि हे दोनच छत्रपती आठवतात एवढी महत्ता छत्रपतीपदाला आली. पंण पुढे ती केवळ एक वंशपरंपरागत पदवी बनली असल्याचे दिसते. राजर्षि शाहू महाराज त्याला अपवाद.

फडणवीस हा शब्द माराठी अथवा संस्कृत नाही. हाही शब्द फारसी-उर्दू मिश्रणातून आलेला. कारकुणांची बसायची जागा तो फड आणि कारकुन म्हणजे फडणवीस असा याचा साधारण ढोबळ अर्थ. कारकुन शब्दही तसा उर्दुच. त्या काळात मराठीवर फारसी भाषेचे वर्चस्व मोठे होते. त्यामुळे बरीच पदनामे ही फारसोद्भव असत. त्यामुळे ही पदे धारण करणारे ब्राह्मणच होते असेही नाही.

आता आपल्याला मध्ययुगाचा सांस्कृतिक इतिहास पाहिला पाहिजे. लेखन-वाचन-पत्रव्यवहार-करारनामे वगैरे करणारा एकच एतद्देशेय वर्ग होता तो म्हणजे ब्राह्मण. कायस्थ हे त्याखालोखाल या पदांसाठी लायक समजले जात. या काळातील; सांस्कृतिक, विशेषत: जातींमधील संक्रमणे व अदलाबदली विलक्षण आहेत. इतिहासात कायस्थांनी ब्राह्मण असल्याचे जे दावे केलेले दिसतात ते यामुळेच. असे अनेक मुळच्या ब्राह्मण नसलेल्या जातींबाबतही झाले व काहींनी ते दावे खरेही करून घेतले.

आज ज्या कोणची अमूक जात आहे असे मानले जाते त्याची जात तीच अगदी पुर्वीपासून होती हे मानणे निरर्थक होऊन जाते ते त्यामुळेच. पण आपण आज एकविसाव्या शतकात आहोत. आधुनिक काळात आहोत. ज्ञान-तंत्रज्ञानाच्या युगात आहोत. पण आपल्या सामाजिक व राजकीय संकल्पना मध्ययुगात होत्या तशाच वेडपट आणि अज्ञानमुलक आहेत. त्यातून आपली सुटका झालेली नाही. किंबहुना त्यातून सुटावे असे आपल्यालाच वाटत नाही.

शरद पवारांच्या अथवा अन्य नेत्यांच्या वक्तव्यांवरुन हेच चित्र दिसते. खरे म्हणजे मध्ययुगातील पदव्यांचे आणि त्यावरून जातींचे स्तोम माजवण्याचे, त्यांचा माज करण्याचे अथवा दुस-यांना हिनवण्यासाठी त्यांचा वापर करण्याचे काहीएक कारण नाही. ब्राह्मण विरुद्ध मराठा हा वाद अलीकडेच पेटवला गेला. मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेडने त्यात मोठी भुमिका बजावली. हा वाद ब्राह्मण विरुद्ध बहुजन आहे अशी मांडनी करण्याचा प्रयत्न करत ब्राह्मण विरोधाचे रान पेटवले गेले. ब्राह्मणांच्या काहीच चुका नाहीत असे म्हणायचे धाडस खुद्द ब्राह्मणही करणार नाहीत. पण प्रत्येक सामाजिक दोषाचे खापर ब्राह्मणांवर फोडायची जी टुम निघाली त्यामागे केवळ राजकारण होते व आहे हे लक्षात घेण्याची गरज आहे.

प्रथम एक बाब लक्षात घ्यायची बाब अशी कि अपवाद वगळता मराठा समाज आपल्याला "क्षत्रीय" म्हनजेच वैदिक समजतो. क्षत्रीय हा वैदिक व्यवस्थेत ब्राह्मणापेक्षा दुय्यम असतो. अगदी प्राचीन काळापासून ब्राह्मण विरुद्ध क्षत्रीय हा वाद वैदिक धर्मेतिहासात हिरीरीने लढला गेलेला आहे. विश्वामित्राचे आद्य उदाहरण देता येईल. क्षत्रीय असलेल्या विश्वामित्राने ब्राह्मणत्व मिळवण्यासाठी किती यातायात केली याच्या असंख्य पुराकथा आहेत. वेदविरोधी क्षत्रीयांनीच उपनिषदे लिहिली असेही आवर्जून सांगितले जाते. ब्रह्मण श्रेष्ठ कि क्षत्रीय हा वाद तर विकोपाक्ला गेला होत्ता. गौइतम बुद्धही क्षत्रीयालाच ब्राह्मणंपेक्षा श्रेष्ठ मानत होता असेही आपल्याला दिसते. शेवटी  क्षत्रीयच कसे नामशेष झाले या  वैदिकांनी कधी परशुरामाचा बहाना दिला तर कधी नंदानेच क्षत्रीय नष्ट केले अशा पुराकथा निर्माण केल्या. मध्ययुगात केवळ रजपुतांना अग्नीकुलोत्पन्न क्षत्रीय अशी मान्यता दिली गेली. एरवी क्षत्रीय नाहीतच अशी वैदिक उद्घोषणा आहे. वेदोक्त प्रकरणात लो. टिळकांनीही हीच भुमिका घेतले होती हे सर्वविदीत आहे. टिळक म्हणाले होते, "या काळात ब्राह्मण व शुद्र असे दोनच वर्ण राहिले असून शिवाजी महाराजही शूद्रच होते. तथापि त्यांच्या कार्यावर मोहित होऊन तत्कालीन महाराष्ट्रातील कर्त्या पुरुषांनी ( म्हणजे वैदिक धर्मीय ब्राह्मणांनी) खास सवलत म्हणून त्यांना क्षत्रियत्व बहाल करून गागाभट्टाच्या हस्ते वेदोक्त पद्धतीने राज्याभिषेक केला ; पण त्या वेळी भोसले घराण्याची सर्व धर्मकृत्ये पुराणोक्तच करावीत अशी परंपरा वैदिक ब्राह्मणांनी घालून दिली होती. हीच परंपरा पाळली गेली पाहिजे. छत्रपती घराण्याशिवाय अन्य मराठे क्षत्रिय नाहीत. सबब त्यांना वेदोक्ताचा अधिकार नाही . . . ." (संदर्भ : "राजर्षी शाहू छत्रपती" ; डॉ जयसिंगराव पवार , पृष्ठ ३५, "लोकमान्य टिळक यांचे चरित्र" , न. चिं. केळकर) अर्थ स्वयंस्पष्ट आहे. ब्राह्मणांव्यतिरिक्त कोणीही वैदिक नाहीत असा निर्वाळा धर्मेतिहासातील तत्कालीन तज्ञ लो. टिळकांनीच हा निर्वाळा दिलेला आहे, तरीही अनेकांच्या मनात क्षत्रियत्वाचे थोतांड एवढे भरलेले आहे कि कोणीही उट्घतो आणि क्षत्रिय म्हणून मिरवतो! आणि वर गंमत म्हणजे सारे सामाजिक दोष ब्राह्मणांनीच निर्माण केलेत असेही घसे फाडून सांगतो. मग तेंव्हा क्षत्रिय (यांचेच पुर्वज) काय करत होते हे सांगायला यांची वाचा का बसते?

थोडक्यात, ब्राह्म्नण श्रेष्ठ कि स्वत:ला क्षत्रीय मानणारे सत्ताधारी वर्ग श्रेष्ठ यांच्यातील हा कलह आहे. तो आजही जीवित असावा यासारखे दुर्दैव नाही. परंतु वैदिक वर्णश्रेष्ठत्वाच्या गारूडात जे अडकले आहेत त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा तरी काय करणार?

मराठीच काय पण भारतातील अन्य राज्यांतील राजकीय कलहातही हा वाद प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष रित्या खेळला जात असतो त्यामुळे हे विवेचन करणे गरजेचे होऊन जाते. वर्चस्व कोनाचे असावे यचा निवाडा या लोकशाहीतझी होणे अशक्य झाले आहे. इतर वैदिकेतरांना यात वापरण्यापुरते दुय्यम स्थान आहे आणि ही लोकशाहीची शोकांतिका आहे. जाती-धर्माचा श्रेष्ठत्वतावाद मिरवत सत्तेची नवी समीकरणे बनवल्याने लोकशाही टिकू शकत नाही याचे भान आपल्याला अजून आले नाही.

जाती-धर्माचे राजकारण अज प्रत्येक पक्ष करतो हेही आपल्या लक्षात आले असेलच. तिकीट देण्यापासून याची सुरुवात होते. निवडून येण्याची शक्यता म्हणजे नेत्याच्या जातीचे उमेदवार मतदारसंघात बहुसंख्य अथवा निर्णायक असणे हा एकमेव निकश. यात गुण-लायकी याला महत्व नसते. पैसा आणि जात हेच काय ते निकश. यात लायक नेते वर येणे व लायकीची स्पर्धा होणे अशक्यच. म्हणजे जातीअंताकडे जातो, धर्मनिरपेक्ष होतो म्हणणारे दुतोंडी गांडुळे आहेत असे म्हटले तर वावगे काय?

आपली लोकशाही ही सरंजामदारांची लोकशाही आहे असे म्हटले तरी चालेल एवढे आपण लोकशाहीचे धिंदवडे काढलेले आहेत. आता तर घटनेलाच धर्मग्रंथ म्हणा असेही म्हटले जाते. यासारखा मुर्खपणा आम्ही भारतियच करु जाणोत. घटना परिवर्तनीय असते, धर्मग्रंथाप्रमाणे अपरिवर्तनीय नाही याचेही भान आम्हाला उरलेले नाही. घटना जणु देशाची नसून एकाच व्यक्तीने बनवली आहे अशा भ्रमात राहणा-यांचीही कमतरता या देशात नाही. पण ज्यांच्या मनात मानवतेपेक्षा जाती आणि धर्माचीच वर्चस्वतावादी वृत्ती ठासून भरली आहे त्यांचे वेगळे काय होणार? जातीच्या क्यन्सरने आम्हाला पोखरले आहे.

शरद पवार किंवा बाकीचे नेते जातीयवादी बोलतात त्याचे नवल वाटत नाही. पेशवे, फडणवीस किंवा छत्रपती हे शब्द जातीनिदर्शक बनवत आहोत हे न समजण्याएवढा निर्लज्जपणा आमच्यातच जर भरला असेल तर त्यांना तरी दोष कोणत्या तोंडाने देणार? वर्चस्व कोणाचे...ब्राह्मणाचे कि क्षत्रीयाचे हेच दाखवण्याचा हा पुरातन उपद्व्याप नाही काय? खरे तर लोकशाहीत एकदा निवडुन आल्यानंतर पंतप्रधान असो कि मुख्यमंत्री...तो सर्वांचाच असतो. त्याला जात-धर्म नसतो. घटनेशी इमानदार राहत जास्तीत जास्त समाजहित होईल असेच काम करणे त्यांच्याकडून अभिप्रेत असते. निर्णयांबाबत टीका करण्याचा, विश्लेशन करण्याचाही अधिकार प्रत्येक नागरिकाचा असतो. यपार व्यक्तीगत जाती-धर्माला मधे आणायचे काम नाही. पण सर्वच चुकत आहेत नि म्हणूनच भारतीय लोकशाहीची चिंता वाटणे स्वाभाविक आहे.

महाराष्ट्र हा पुरोगामी आहे असे समजायचा प्रघात आहे. शाहू-फुले-आंबेडकर नांवे घेतली, त्यांचा जयघोष केला म्हणून कोणी पुरोगामी होत नाही. पुरोगामीपणा विचारांत व कृतीत असावा लागतो. उक्तीही प्रतीगामी आणि कृती तर पुरेपूर प्रतिगामी आहेत हेच या वादळावरून दिसते. महाराष्ट्र कधीच पुरोगामी नव्हता हेच काय ते खरे. खुद्द शाहु-फुले-आंबेडकरांची वैचारीक पायमल्ली करणारे कोणत्या तोंडाने त्यांचे नांव घेतात हे अनाकलनीय आहे. कोणताही राजकीय पक्ष अथवा कोनतीही सामाजिक संघटना या प्रतिगामीत्वात मागे नाही. कोण डावे कोण उजवे एवढाच वाद घालता येईल अशी आपली सामाजिक स्थिती आहे. इतिहासकाळातील पदे आजही उणे-दुणे काढण्यासाठी वापरली जात असतील तर प्रतिगामीत्वाचा कोणता कळस गाठायचा बाकी राहीला आहे? आज या पदांची कोणती महत्ता आहे? संभाजीराजे भाजपातर्फे खासदार होतात की अन्य पक्षामार्फत हा सर्वस्वी त्यांचा आंणि संबंधीत पक्षांचा निर्णय आहे. ते आता सामान्य नागरिक आहेत. "मराठा जातियवाद्यांचा कळपात गेला" हे विधानच जातीयवादी आहे. लोकांना त्यांच्याबाबत शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून आदर वाटणे ही वेगळी बाब झाली. पण ते आज लोकशाहीत सरंजामदारशाही युगातील छत्रपती अथवा पेशवे अथवा फडणवीस उरलेले नाहीत याचे भान लोकांनीही ठेवले पाहिजे. पण राजामहाराजांचे आकर्षण सुटत नाही हे भारतभरचे चित्र आहे.

आम्हाला माणसांशी माणुस म्हणुन नाते बांधणारा माणुस हवा आहे! आमची लोकशाही (?) टिकु शकली तर ती याच पायावर टिकेल. अन्यथा धर्मा-धर्मातच नव्हे तर जाती-जातींतही वर्चस्वासाठी युद्धे सुरु होतील याचे भान आम्हाला आता तरी यायला हवे. लोकशाही टिकते ती सुजाण नागरिकांमुळे व समतेच्या व स्वातंत्र्याच्या पायावर. आमच्या देशात स्त्रीयांना अजून दुय्यम स्थान आहे. धर्मात तर तिला जवळपास स्थानच नाही. अनेक मंदिरांत जाण्याचे आजही बंदी आहे. अनेक जातींबाबतही ही बंदी कायम आहे. मुस्लिमांत तर स्थिती अजून विदारक आहे. साधा समान नागरी कायदा आम्ही अद्याप आणु शकलेलो नाही. अशरफ-अजलफ मुसलमानांतील संघर्ष आजही आहे. ख्रिस्त्यांतही जातीत्यवाद एवढा कि पुर्वास्पृष्य धर्मांतरितांसाठी वेगळे चर्चेस व वेगळ्या स्मशानभुम्या आहेत. आम्ही मानवतेचे विध्वंसक आहोत आणि श्रेष्ठ भारतियत्वाचे वृथा गुणगाण करतो. आमचे निवडणुकांतील सोशल इंजिनियरिंग म्हणजे सोशल डिस्ट्रक्शन आहे हे कोणीतरी समाजाला कान पिळुन सांगायची गरज आहे.

कोण करणार हे?

आम्हा प्रत्येक नागरिकाला हे काम करावे लागेल. मसीहा येत नसतात. तेही एक भ्रमजाल आहे. मसीहा म्हणजे मुर्खांच्या कळपातील कोणी एक अर्धशहाणा. सर्वांनीच शहाणे होत आपणच आपला पुर्णशहाणा मसीहा व्हायला काय हरकत आहे?

-संजय सोनवणी

Monday, June 6, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


असुर सूर्य : असुर संस्कृती

Posted: 05 Jun 2016 10:17 PM PDT

- संजय सोनवणी
'साहित्य चपराक' जून २०१६ 

जगातील सर्वात प्राचीन संस्कृती कोणती? देवांची का असुरांची? असुर संस्कृती जवळपास अर्धे जग व्यापलेली संस्कृती होती याचे निर्णायक पुरावे आपल्या हाती आहेत. तुलनेने देव-संस्कृती अर्वाचिन. ब्राह्मण ग्रंथातही असुर व देव हे प्रजापतीचीच अपत्ये असून असुर थोरले असे स्पष्ट निर्देशीले आहे. ऋग्वैदिक देवता वरुण, अग्नी, इंद्रादि यांना आरंभीच्या ऋग्वेद काळात आदरार्थी देव नव्हे तर असुर हे संबोधन वापरलेले आहे; पण असुर संस्कृतीची पुरातनता पाहायला आपल्याला फक्त ऋग्वेद अथवा पुराणांवर अवलंबून राहण्याचे कारण नाही. पारशी धर्मग्रंथ अवेस्ता ते असिरिया भागातील अवशेष व त्यांचे इष्टिकालेख आपल्याला आता पुरावा म्हणून उपलब्ध आहेत. त्यावरून आपण असुर संस्कृतीच्या पुरानत्वाची आणि व्यापकतेची माहिती घेऊ शकतो. आज भारतात तरी असुर ही संज्ञा अत्यंत बदनाम झालेली असून पुराणातील असुरांच्या मूळ कथांचे विकृतीकरण केले गेल्याने आज असुर म्हटले की दुष्ट, मायावी, मनुष्यघातकी, नरभक्षक इ. वाईट बाबीच मनात येतात; पण आपण पुरातन वास्तव पाहिले तर मात्र आश्चर्याचा धक्का बसल्याखेरीज राहणार नाही. वस्तुत: असुर संस्कृतीची व्याप्ती भारत, पर्शिया (इराण-अफगाणिस्तान) ते सुदूर मेसोपोटेमिया व इजिप्त येथवर असल्याचे स्पष्ट पुराव्यांनिशी दिसून येते.

असिरियन संस्कृती (असुरांची संस्कृती) ही मुळातच अस्सूर (अशुर/अशिर) या शब्दापासून बनली आहे. अस्सुर शहर हे टायग्रिस नदीच्या पश्चिम किनार्‍यावर वसलेले होते. त्याचे अवशेष आजही इराकमध्ये पाहायला मिळतात. हे शहर इ. स. पू. 2600 मध्ये वसवले गेले. अस्सुर ही या नगराचीच नव्हे तर असिरियन लोकांची प्रमुख देवता होती. असिरियन राजांच्या नावातही असुर हा शब्द सामाविष्ट असे. जसे असुर बनीपाल, पुझुर असुर, असुर उबालित, अशुर निरारी वगैरे. असुर ही असिरियनांची मुख्य देवता होती व राजा हा असुराचा प्रतिनिधी म्हणून राज्य करत असे. म्हणजे खरा राजा असुरच (म्हणजे सूर्य) आहे व त्याच्यातर्फे मानवी व्यक्ती राज्य करते अशी संकल्पना असिरियनांची होती.


असुर म्हणजे सूर्यदेवता. किंबहुना सूर्यालाच असिरियन असुर असे म्हणत असेही स्पष्ट दिसते. असुर देवतेच्या प्रतिमांतही पंख पसरलेली सूर्य देवताच दर्शवली जाते. तो असिरियन पुराणकथांत देवांचा देव आहे, पर्वताचाही देव आहे आणि असुर शहराचाही देव आहे. याच्या सन्मानार्थ असिरियात अनेक मंदिरे बांधली गेली. अगदी ख्रिश्‍चन काळातही असिरियनांनी असुरपूजा सोडली नाही. 


असुराबरोबरच असिरियन लोक अन्य देवताही पुजायचे. किंबहुना प्रत्येक शहराची स्वतंत्र नगरदेवता असायची, जसे आपल्याकडे आजही प्रत्येक गावाला व नगराला गावदेव अथवा गावदेवी असते तसेच. या देवतांत अनू, बल, एन्लिल, इश्तार, नाना (सिन) वगैरे देवता होत्या. एका अर्थाने एक मुख्य देवता मानत बहुदेवतावादही असिरियन देवतात होता असे स्पष्ट दिसते. असिरियन साम्राज्य सत्ताधारी वंश बदलत गेले असले तरी इसवी सनाच्या सातव्या शतकापर्यंत टिकले.


इजिप्तमधील ओसिरिस (ओसायरिस, औसिर, असिरी) ही परिवर्तन, पुनरुत्थान, जन्म आणि मृत्युची देवता मानली जाते. अगदी आपल्या शिवासारखीच. असुर या शब्दाचेच हे इजिप्शियन भाषेतील रुप आहे. ओसिरिसला आकाश, भूमी किंवा सूर्यदेवताराचे अपत्य मानले जाते हेही येथे उल्लेखनीय आहे.


असुर आणि सूर्य यातील संबंध येथे आपल्या लक्षात आला असेलच. असिरियनांसाठी असुर हा सूर्यच आहे तर काही इजिप्शियन पुराणकथांनुसार तो सूर्यपुत्र आहे. हे साम्य येथेच संपत नाही. ऋग्वेदानुसारही असुर हे सूर्याचेच एक नाव आहे. खालील ऋचा पहा:


पश्यन्नन्यस्या अतिथिं वयाया रतस्य धाम वि मिमेपुरूणि।
शंसामि पित्रे असुराय शेवमयज्ञियाद्यज्ञियं भागमेमि॥
(ऋ. 10.124.3)
दविधा सूनवो असुरं सवर्विदमास्थापयन्त तर्तीयेनकर्मणा।
सवां परजां पितरः पित्र्यं सह आवरेष्वदधुस्तन्तुमाततम॥ 
(ऋ. 10.56.6)
उक्षा समुद्रो अरुषः सुपर्णः पूर्वस्य योनिम पितुर आ विवेश।
मध्ये दिवो निहितः पर्श्निर अश्मा वि चक्रमे रजसस पात्य अन्तौ॥
(ऋ. 5.47.3)
पतंगमक्तमसुरस्य मायया हर्दा पश्यन्ति मनसाविपश्चितः।
समुद्रे अन्तः कवयो वि चक्षते मरीचीनाम्पदमिछन्ति वेधसः।
(ऋ. 10.177.1)


या ऋचा व ऋग्वेदात विखुरलेले अन्य संदर्भ यावरुन लक्षात येते की वैदिकांच्या दृष्टीनेही असुर ही मुळची सूर्यदेवताच होती किंवा सूर्यालाच ते असुरही म्हणत असत. असुर देवता निर्मितीचे कारण तर होतीच; पण स्वर्गस्थान व अंतरिक्षही असुरांशीच निगडित होते. वैदिक साहित्यात असुर वीरांना 'स्वर्गाची मुले' म्हटले गेले आहे.  असुर आणि सवितृ यांचे सोन्याच्या हातांचे असे वर्णन 1.35.9-10 या ऋचांमध्ये करण्यात आले असून सवितृ हे सूर्याचेच एक नाव आहे हे आपल्याला माहीत आहे व अनेक ठिकाणी सवितृलाही असुर हे संबोधन वापरले गेलेले आहे. असुर हे सूर्यपूजक होते असे 10.177 या ऋचेवरुन एस. कल्याणरमणही म्हणतात. असुर हे समाज म्हणून सूर्यपूजक व असुर हे संबोधन म्हणून सूर्यनिर्देशक असाच याचा अर्थ दिसतो. पतंग हा शब्द येथे सूर्याचे नाव म्हणून वापरला आहे. ऋग्वेदात सूर्याला अनेक नावे असली तरी सुपर्ण असेही एक नाव आहे व ही नावे असुरांकडेच निर्देश करतात असे डॉ. मालती शेंडगे यांनी सप्रमाण दर्शविले आहे. 


वैदिक साहित्यात सूर्यालाच असुर म्हटले जात होते हे वाचून धक्का बसणे स्वाभाविक आहे; पण हे एवढ्यापुरते मर्यादित नाही. वैदिकांनी नंतर असुरांना बदनाम करण्याची मोहीम काढली असली तरी त्याची कारणे सर्वस्वी सांस्कृतिक/धार्मिक संघर्षात आहेत; पण आरंभीचा वैदिक धर्म हाही असुरकेंद्रितच होता हे वरुण-इंद्रादि देवतांना आरंभी 'असुर' हे संबोधन आदरार्थाने वापरले आहे यावरून सिद्ध होते.


अहुर माझ्दा (सं. असुर-मेधा) हा झरथुस्ट्री धर्माचाही एकमात्र ईश्वर. देव हे या धर्मात दुष्ट, पापी मानले जातात. अहुर हे असुर शब्दाचे पर्शियन रुप होय. अहुर माझ्दा हा विश्वनिर्माता व वैश्विक न्यायाचा रक्षणकर्ता असून त्याचा सर्वसाधारण शब्दश: अर्थ उच्चबुद्धिमत्तेचा, शक्तीशाली असा घेतला जातो. अहुर माझ्दाच्या धर्माची पुनर्स्थापना झरथुस्ट्राने उत्तर अफगाणिस्तानात ऋग्वेदाच्या समकालीन (इसपू 1500) केली. म्हणजे झरथुस्ट्राच्या पूर्वीही हा धर्म होताच परंतु त्यात अनेक अपप्रथा घुसल्या होत्या. त्या दूर करत झरथुस्ट्राने संदेष्ट्याच्या भूमिकेत जात अहुर माझ्द्याचा खरा धर्म लोकांना सांगायला सुरुवात केली. यात अहूर माझ्दा हा श्रेष्ठ ईश्वर असून ते सूर्याचेच एक नाव आहे. जरथुस्ट्री धर्मात प्रार्थना या अग्नी (सूर्याचेच एक रुप) किंवा सूर्यासमक्षच म्हटल्या जातात. झुर्वेनाइट ही झरथुस्ट्री धर्माचीच एक शाखा आहे. ही शाखा सूर्यालाच अहुर-माझ्द म्हणते. एवढेच काय पण खोतानी शक हेही अपभ्रंशित रुपात सूर्याला अऊरमाझ्दे म्हणतात. आजही अनेक इराणी बोलीभाषांत सूर्याला ओर्मोझ्द असेच म्हटले जाते हे झरथुस्ट्री धर्माच्या प्रकांड अभ्यासिका मेरी जोइस यांनी दाखवून दिलेले आहे. (इेूलश, चरीू (1983), Aर्हीीर चरूव, एपलूलश्रेरिशवळर खीरपळलर 1, छशु धेीज्ञ: र्ठेीींश्रशवसश  घशसरप झर्रीश्र, िि. 684-687)
असुरांसंबधी अन्य विवेचन करण्याआधी हे विवेचन अत्यंत महत्त्वाचे वाटल्याने आधीच केले आहे. असुर आणि सूर्य यातील अन्योन्य संबंध वाचकांच्या लक्षात एव्हाना आलाच असेल. असुर म्हणवनारे लोक हे भारत ते मेसोपोटेमियापर्यंत पसरलेले होते. असुर हीच त्यांची मुख्य देवता होती. असुर हे सूर्याचेच संबोधन होते. सूर्य हा मानवी जगाचा आदिम काळापासून केंद्रबिंदू असणे स्वाभाविक आहे. काही समाजांनी आपल्या दैवत रचनेत त्यालाच केंद्रवर्ती स्थान दिल्याने त्याच्या भवती जी संस्कृती केंद्रित झाली तीच असुर संस्कृती होय.


सूर्य हा तत्कालिन जगाने अत्यंत गूढमय, रहस्यमय दृष्टीने पाहिला असल्यास नवल नाही. दिवस आणि रात्र ही विभागणी चांगले आणि वाईट याप्रमाणे करत आरंभिक कल्पना तेवढ्याच गूढ पद्धतीने विकसित केल्या जाणे स्वाभाविक होते. असुर या शब्दाची वैदिक व्युत्पत्ती असू: म्हणजे प्राणवान-वीर्यवान या शब्दाला 'र' हा प्रत्यय लागून असुर शब्द बनतो असे संस्कृततज्ज्ञ म्हणतात. असुर शब्दाचा खरा अर्थ प्राणवान, वीर्यवान, पराक्रमी असा आहे हे भारतीय संस्कृती कोश (खंड 1, पृ. 337) मध्ये सांगितले आहे परंतु ही व्युत्पत्ती कृत्रिम आहे हे उघड आहे. कारण असिरियन संस्कृतीची भाषा ही सेमेटिक गटातील आहे. या भाषेचा कथित इंडो-युरोपियन भाषांशी काहीही संबंध नाही. असुर, अस्सुर, अशुर, अशेर हे शब्द मानवाच्या आदिम भाषेतील आद्य शब्दसमुहांपैकी एक असले पाहिजेत ज्यांचा भाषागटांशी काहीएक संबंध नाही. डॉ. आ. ह. साळूंखेही असुर शब्दाची व्युत्पत्ती अन्य भाषांतच शोधली पाहिजे असे बळीवंशमध्ये म्हणतात. त्यामुळे असिरियन (अक्काडियन) लोक भारतात आले व त्यांनी सिंधू संस्कृती वसवली किंवा सिंधू लोकांनी असिरियन संस्कृती वसवली असे काही विद्वान (उदा. मालती शेंडगे, रा. ना. दांडेकर) प्रतिपादित करतात त्यात अर्थ नाही. सूर्याला कोणीतरी आधी असुर म्हणाले आणि तो शब्द विविध टोळ्यांत संक्रमित झाला व काही टोळ्यांनी सूर्यकेंद्रित असुर संस्कृत्या जोपासल्या एवढेच फारतर येथे म्हणता येईल. कोणतीही संस्कृती उदयाला आली की, ती विरोधात अथवा स्वतंत्रपणे इतरही संस्कृत्या निर्माण होतात. असुर धर्म आणि वैदिकांचा देव धर्म यात कशी फूट पडली त्यावरून आपल्या लक्षात येईलच. पुढे ऋग्वेदातच असुर हे मुख्य देवतांचे संबोधन गळून पडते आणि असुर हा शब्द कटाक्षाने केवळ शत्रुंसाठी वापरला जावू लागतो. हा सांस्कृतिक संघर्ष आपण पुढे समजावून घेऊ. अहुरमाझ्दा धर्मात असुर हे सृष्ट तर देव हे दुष्ट आहेत हे आपल्याला माहीत आहेच.


किंबहुना सूर्य हा वैदिक शब्द मूळच्या असुर या शब्दावरुनच साधला गेला असावा हे असुर आणि सूर्यामधील अभेदावरून दिसून येते. मग असूर्यचे सूर्य कसे झाले? त्याचे कारण पुरातन सांस्कृतिक संघर्षात आहे. असुरांच्या विरोधात सुर हा शब्द देवासुरांतील झगड्यामुळे निर्माण केला गेला. सुर हा शब्द संस्कृतात कृत्रिम व नंतरचा असून असुर हाच मूळचा शब्द आहे, असुर शब्दातील 'अ' हा नकारार्थी नसून असू: या शब्दाला 'र' हा प्रत्यय लागून तो शब्द बनला आहे असे डॉ. रा. ना. दांडेकर (वैदिक देवतांचे अभिनवदर्शन, पृ. 43-46) म्हणतात. सूर्य जर सूर या शब्दापासून बनवला गेला असेल तर असूर्य हाच शब्द मुळचा असायला हवा. असुर हा शब्दच मुळात सूर्यवाचक आहे हे आपण पाहिलेच आहे. असूर्य शब्द ऋग्वेदात वेगळ्या संदर्भात, म्हणजे असुरांचे स्थान दाखवण्यासाठी (ऋ. 7.21.7) वापरला गेला आहे हेही महत्त्वाचे आहे. ती ऋचा अशी-


देवाश्चित ते असुर्याय पूर्वे.अनु कषत्राय ममिरे सहांसि ।
इन्द्रो मघानि दयते विषह्येन्द्रं वाजस्य जोहुवन्त सातौ ॥


येथे देव हे पूर्वीचे असुर या अर्थाने घेतले आहेत. देवांनाच पूर्वी असुर म्हटले जायचे याचे भान या ऋचेत दिसते. देव हा शब्दही दिव किंवा द्यौस या शब्दातून आला आहे. त्याचाही अर्थ प्रकाश अथवा सूर्य असाच होतो हेही येथे लक्षात घेतले पाहिजे. म्हणजे असुरांशी संघर्ष करणार्‍या गणांनी असुर हे नाव टाकत देव हे नाव स्वीकारले खरे पण मुळबोध कायम ठेवला हेच तेथे सुचित होते.
येथे लक्षात घायची बाब म्हणजे आपण मानतो त्याप्रमाणे असुर हा शब्द अवमानदर्शक नाही. तो सूर्यनिदर्शक आहे. मानवाला तेजोमान सूर्य पवित्र, यातुमय, गुढ, जीवनदाता, धीर देणारा, अंधाराला (म्हणजेच अनिष्टलाही) दूर करणारा वाटला नसला तर नवल नाही. हा शब्द (असुर अथवा सूर्य) मूळचा वैदिक नाही. हा शब्द आदिम शब्दसमुहांपैकी एक असून स्थानिक उच्चारपद्धतींप्रमाणे वेगवेगळा जसा उच्चारला जात असे तशाच त्याभोवतीच्या पुराणकथाही वेगवेगळ्या बनल्या असे दिसते. हा शब्द मूळचा अक्काडियन भाषेतील असावा असा डॉ. मालती शेंडगे यांचा कयास आहे तर डॉ. आ. ह. साळूंखे सुचवतात की, असुरांच्या संस्कृतेतर भाषेतच या शब्दाचे मूळ शोधले पाहिजे.


सिंधू संस्कृतीचे लोक आणि मेसोपोटेमियात पुरातन कालापासून व्यापारानिमित्त संबंध होता तसाच तो प्राचीन इराणशीही होता. व्यापारी वस्तुविनिमय जसा दोन संस्कृत्यांत होतो तसाच तो काही शब्द व सांस्कृतिक/धार्मिक संकल्पनांतही होत असतो. त्यामुळे शब्द एका ठिकाणावरुन दुसरीकडे गेला असा अंदाज बांधता येईल; पण कोठून कोठे हा प्रवास झाला हे मात्र सांगता येणार नाही. शिवाय सूर्याचा परिचय मानवी समाजाला लाखो वर्षांपूर्वीच झाला असल्याने त्याला विविध प्रदेशांतील मानवाने काहीना काही नाव दिले असणार व ते प्रचारित झाले असणार हेही तेवढेच खरे. त्यामुळे त्याचे मूळ शोधण्यापेक्षा असुर म्हणजे मूलत: सूर्य एवढे समजावून घेतले तरी असूरांकडे पाहायचा दृष्टिकोन आमुलाग्र बदलायला मदत होईल एवढे नक्की! सिंधू संस्कृतीतील मुद्रांवर सूर्याचे चित्रण केले गेले आहे हेही येथे उल्लेखनीय आहे. सिंधू संस्कृती ही मूळ असुरांची संस्कृती. ते वास्तुकलेत निष्णात होते. या स्मृती मयासुराच्या रुपात पुढेही जपल्या गेल्या.

असुर हे मानवही!


असुरांबाबत अनेक लोकभ्रम आज निर्माण झाले आहेत. असुर ही कोणी काल्पनिक, पुराणकथांनी रचलेली मित्थकथा नाही. असिरियन लोक मानवच होते हे तर स्पष्ट आहे. असुर हा शब्द जसा संबोधन म्हणून वापरला जातो तसाच समुहवाचकही वापरला जातो. असुर हे सूर्याचे जसे नाव होते तसे अनेक मानवी समुदायांचेही होते. प्रत्येक समुदायाची संस्कृती ही असूरकेंद्री असली तरी त्यात स्थानिक देवदेवतांनाही स्थान होते. काही असुर मूर्तीपूजक होते तर काही असुराची अर्चना अग्नीमार्फत  (यज्ञ - यस्न) करायचे. ऋग्वेदात अग्नीलाही अनेकदा असुर म्हटलेले आहे. त्वमग्ने रुद्रो असुर... असे तैत्तिरिय ब्राह्मणातही (3.11.2.2) म्हटलेले आहे. किंबहुना अग्नीला सूर्याच्याच समकक्ष मानण्याची धार्मिक प्रथा होती. भारतातील असुर मात्र लिंगपूजक अथवा शिव-शक्ती पूजक होते. परंतु सूर्याशी संबंधित काही प्रतीके मात्र शिवाशी जोडलेलीच राहिली. उदा. वृषभ, पर्वत, चंद्रकोर. (चंद्र सूर्यपुत्र आहे असा प्राचीन काळी समज होता.) 


या असुरांचा धर्म नेमका काय होता हे ऋग्वेद सांगत नाही. झरथुस्ट्री धर्माचे लोक मात्र वेगळ्या पद्धतीचा यज्ञधर्मच पाळत. जे असुर झरथुस्ट्राच्या धर्मात गेले नव्हते ते नेमका कोणता धर्म पाळत याचे विवेचन नसले तरी ऋग्वेदातील अकर्मन (कोणतेही कर्मकांड नसलेले), अब्रह्म (मंत्र नसलेले), अयज्वन, अयज्जु (यज्ञ नसलेले), अव्रत:, अन्यव्रत: (व्रत नसलेले, अन्य व्रत असलेले) असे उल्लेख दास-दस्युंबाबत मिळतात. सर्वात महत्त्वाचा उल्लेख आहे तो शिस्नदेव, म्हणजे लिंगाची उपासना करणारे. यांच्याबाबत तर प्रचंड द्वेष व्यक्त केला गेला आहे.  हे दास-दस्यू असुर संस्कृतीचाच भाग असल्याने ही वर्णने असुरांसाठीचीच आहेत असे म्हणता येईल. परंतु त्यातून सर्व असुरांच्या धर्माचा, धर्मतत्वांचा विशेष बोध होत नाही हेही तेवढेच खरे. तरीही आपल्याला झरथुस्ट्री धर्माची तत्त्वे व उपासनापद्धतीही माहीत आहेत. ती वैदिकांपेक्षा फारशी वेगळी नव्हती. याचे कारण असुर व देवांच्या विशिष्ट सांस्कृतिक इतिहासात दडलेले आहे. असुर व देव हे दोघेही प्रजापतीची संताने होत असे शतपथ ब्राह्मण सांगते. दोघांनाही यज्ञ हवा होता; पण देवांनी यज्ञ पळवला व जो अवशिष्ट वाईट भाग होता तो असुरांसाठी ठेवला अशी कथा येथे येते. झरथुस्ट्री धर्मातही यज्ञ होताच पण त्याला हिणवण्यासाठी हे कथा बनली हे उघड आहे; पण याचा दुसरा अर्थ असाही होतो की एके काळी दोन्ही (देव व असुरही) एकच धर्म पाळत असत. पुढे त्यांच्यात फुट पडली ते बहुदा झरथुस्ट्राने असुर धर्माला नवे स्वरुप द्यायला सुरुवात केल्यानंतर. त्यामुळे सुरुवातीला असूरकेंद्री असलेला वैदिक धर्म असुरविरोधी बनला.


शतपथ ब्राह्मणात अजून एक कथा येते (10.9.3.7-9) ती अशी. सौत्रामनी यज्ञ हा आधी असुरांचाच होता. तो नंतर देवांनी घेतला. म्हणजेच काही असुर घटकांचा कर्मकांडात्मक धर्म यज्ञाभोवती फिरत होता तर काहींचा अमुर्त देवतांभोवती तर काहींचा लिंगपुजा, वृक्षपुजा ते अन्य अनाम देवतांची पुजा या भोवती असे दिसते. त्यामुळे एक संस्कृती असली तरी सर्वांतच मैत्रही नव्हते आणि धर्मही एकच नव्हता.


आणि हे तत्कालीन स्थिती, भुगोलाचे ज्ञान, जनसंख्या आणि आपापसातील अनेक कारणांनी उद्भवणारे संघर्ष पाहता स्वाभाविकही होते. येथे एक लक्षात घेणे आवश्यक आहे ते म्हणजे असुर जसे आदरार्थी इंश्वरी नाम/संबोधन आहे तसेच ते मानव समुहांचे व मानवाचेही नाव आहे. देव याला अपवाद नाही. देव हे एक समाजनामही होते हे लक्षात ठेवले पाहिजे.


येथे हे स्पष्टपणे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की ऋग्वेदातील असुर (देवता म्हणून उल्लेख असतील किंवा शत्रू म्हणून) हे भारतीय पुराणकथांतील असुर नव्हेत. वल, नमुची, शंबर, वृत्र इत्यादी जे असुर ऋग्वेदात शत्रू म्हणून उल्लेखले आहेत ते सर्वस्वी प्राचीन इराणमधील आहेत. त्यातील काही असुर (उदा. वृत्र) तर निसर्गाची रुपके आहेत. त्या देवासूर युद्धांचा आणि भारतातील असुरांचा त्यांच्याशी संबंध नाही; परंतु आपण आपला सांस्कृतिक इतिहास पाहताना कोणता मानवी समुदाय कोठला हे तपासले नसल्याने व कोणत्या पुराणकथा कोणत्या भौगोलिक क्षेत्रात रचल्या गेल्या याचा अदमास न घेतल्याने आपले आपल्याच इतिहासाबाबत पुष्कळ गैरसमज आहेत. असुर संस्कृतीच्या विस्ताराचाही आपल्याला अंदाज आला नाही. भारतातील असुरांबाबत आपल्याला जी माहिती मिळते ते पुराणांतून, महाभारतातून व काही प्रमाणात ब्राह्मण ग्रंथांवरून. त्यातही वैदिक पुराणकथांतून झिरपलेल्या कथा कोणत्या हेही समजावून घ्यावे लागते. या कथांवर अनेक पुटे शत्रुभावनेने चढवली गेली असली तरी त्यातून आपण भारतीय असुरांचा इतिहास शोधू शकतो. हा फरक का हे जोवर आपण ऋग्वेद व अवेस्त्याचा भूगोल समजावून घेत नाही तोवर समजणार नाही.


असे असले तरी असुर संस्कृती पुरातन असून तिला विरोध करण्यासाठी असंतुष्टांनी स्थापन केलेली संस्कृती म्हणजे देव संस्कृती. ही कधी आणि कोणी निर्माण केली हे आपण आज सांगू शकणार नाही; पण वैदिक संस्कृती या संस्कृतीचीही निर्माती नव्हे. वैदिक संस्कृती ही असुरांकडून विरोधी गटात, म्हणजेच देवांकडे कशी गेली याचा क्रमबद्ध वृत्तांत ऋग्वेदातच येतो.
झरथुस्ट्रानेही असुर धर्माचे पुनरुज्जीवन केले. त्याने नव्याने धर्म स्थापन केला नाही तर विस्कळीत धर्माला एकत्र करण्यासाठी नवे तत्त्वज्ञान रचले. झरथुस्ट्राच्या गाथांत झरथुस्ट्री धर्माआधीच्याही अनेक गाथा आहेत. त्या पारशी पंडितांनी संबोधने बदलून वापरल्या असे मेरी जोइस म्हणतात. म्हणजेच झरथुस्ट्री धर्म स्थापन होण्यापुर्वी खूप आधीपासून असुर संस्कृती व धर्म अस्तित्वात होताच. झरथुस्ट्राने देवांना दुष्ट व शत्रू मानले. देव हे वाईट, सर्व पापांचे मूळ. अंग्रमैन्यु (इंद्र) हा अहुर माझ्दाचा मुख्य शत्रू.


म्हणजेच देव (दिव/द्यौस) हा शब्दही अचानक उगवलेला नाही. देवांना मानणारे काही समाज होतेच व त्यांचेही वेगळे धर्म होते. कदाचित हा धर्म असुरांना विरोध करणार्‍या जनसमुहांनी शत्रुत्वातूनही निर्माण केला असू शकेल; पण या धर्माची निर्मिती वैदिकांनी केली नव्हती हे निश्चित. ऋग्वेदात आधी असुरत्त्व प्रामुख्याने येत असून वरुण, मित्र, अग्नी, सवितृ, रुद्र, आदित्य, पुषाण, आर्यमान व इंद्राला उद्देशून आदरार्थी संबोधन म्हणून असुर हा शब्द वापरला आहे. ऋग्वेदात 105 वेळा असुर शब्द येतो. त्यात 90 ठिकाणी त्याचा वापर पूजनीय/आदरणीय उपाधी म्हणून केला आहे. असुर उपाधी मात्र नंतर नाहीशी होते व असुर हे दुष्ट/मायावी म्हणून अवतरु लागतात. हा बदल झाला आहे त्यामागे इराणमधील विविध टोळ्यांतील संघर्ष व झरथुस्ट्री माझ्दायस्नी धर्माचे वाढलेले प्राबल्य व वैदिकांची झालेली पीछेहाट हे महत्त्वाचे कारण आहे. या संघर्षाचे प्रतिबिंब आपल्याला ब्राह्मण ग्रंथांत ठळकपणे दिसते. किंबहुना काही वैदिकांना भारतात शरणार्थी म्हणून का प्रवेश करावा लागला याचे कारण असुर धर्माच्या प्राबल्यात आहे. ब्राह्मण ग्रंथात देवासुरयुद्धांचे जे अतिरंजित वर्णन येते ते याच शत्रूभावनेतून हेही येथे लक्षात घ्यावे लागते.


पुरातन काळात सुष्ट व दुष्ट शक्तींना गूढत्व जसे दिले जायचे तसेच मानव आणि त्या शक्तींतील एक संबंधही रुपकात्मक गूढरम्यतेने जोपासला जायचा. पुरावाङ्मयात हा गुण (अथवा दोषही) ठळकपणे दिसतो. ऐतिहासिक घटना नोंदवतानाही अनेकदा प्राचीन ग्रंथांनी त्यांचे मिथकरुपानेच वर्णन केले आहे. त्यामुळे मिथके बनवण्याची प्रत्येक धर्माची पद्धत लक्षात घेतली तरच इतिहासाचे बिंदू हाती लागतात व इतिहासाचे मर्म आपल्याला समजावून घेता येते. त्यांना काही लोक भाकडकथा या सदरात टाकतात ते उचित नाही. इंद्राने विजय मिळवला अशा अर्थाची ऋचा येते तेव्हा याचा अर्थ खुद्द इंद्राने नव्हे तर इंद्राला मुख्य देवता मानणार्‍यांनी विजय मिळवला असा घ्यावा लागतो. तसेच देवासुरांची युद्धे पाहताना मिथके कोणती व प्रत्यक्ष घडली असलेली, तरीही मिथकांत आवेष्टित केली गेलेली युद्धे कोणती याचाही नीट धांडोळा घ्यावा लागतो.


मिथकांतून व पुरात्वीय पुराव्यांतून इतिहास उलगडतो असा. असूरांच्या दृष्टिने देव दुष्ट तर देवांच्या दृष्टिने असुर दुष्ट हे एक द्वंद्व होते हे समजावून घेणे गरजेचे आहे. त्याखेरीज आपल्याला आशियायी व म्हणूनच आपल्या सांस्कृतिक इतिहासाचा बोध नीटपणे होणार नाही.
- संजय सोनवणी

Saturday, June 4, 2016

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)

संजय सोनवणी (Sanjay Sonawani)


लक्षवेधी ‘असूरवेद’!

Posted: 03 Jun 2016 10:46 PM PDT

संजय डहाळे

राज्य नाट्य स्पर्धेच्या मांडवाखालून अनेक दर्जेदार नाटके, अभिनेते, तंत्रज्ञ गेले आहेत. खर्‍या अर्थाने एक 'प्रयोगशाळा' म्हणून ही स्पर्धा आजही रंगकर्मींना खुणावतेय. नवनवीन संहिता अन् त्याचे हटके सादरीकरण त्यात दरवर्षी बघायला मिळते. यंदाही 'असूरवेद' या नाटकाने रसिकांना विचार करण्यास भाग पाडले आहे. केवळ 'प्रथम क्रमांक विजेते नाटक' इतपतच त्याची ओळख शिल्लक उरणार नाही तर धर्म-अधर्म, पुराणकाळ-भविष्यकाळ, सत्य-असत्य यावर प्रभावी नाट्यमय भाष्य करणारी नाट्यकृती आकाराला आली आहे. आता या नाटकाचे काही प्रयोग हे आयोजित करण्यात येत आहेत. त्यामुळे रसिकांना 'असूरवेद'चे दर्शन होत आहे ही समाधानाची बाब. नाहीतर केवळ नाट्यस्पर्धेपुरते हे नाट्य उरले असते, पण 'कलासाधना'ने रसिकांपर्यंत नाट्य पोहोचविण्याची धडपड केली. जी कौतुकास्पद म्हणावी लागेल.

संस्कृतीविषयक संशोधन करणारे संजय सोनवणी यांची 'असूरवेद' ही कादंबरी प्रसिद्ध झाली होती. त्या कादंबरीवर आधारित नाट्यरूपांतर सुनील हरिश्‍चंद्र यांनी केले. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. कादंबरीचा आवाका मोठा. त्याचे नाट्यरूपांतर करताना परिश्रम घेतल्याचे जाणवते. स्वत: सुनील हरिश्‍चंद्र हे कल्पक रंगकर्मी असल्याने ही किमया त्यांनी केली. विषय तसा गंभीर व चक्रावून सोडणारा, पण त्यातही एक गूढता, उत्कंठा तसंच कुतूहल असल्याने विषय डोईजड होत नाही. रहस्यप्रधान नाट्य बघत असल्याचा अनुभव मिळतो.

संशोधक सुरेश जोशी यांचा अचानक खून होतो. पेशानं प्राध्यापकी करणारे जोशी यांचे तसे कुणी शत्रू नसतात. तरीही त्यांच्यावर हल्ला होतो. त्यात ते जातात. ऐतिहासिक मूर्तींमागे शोध घेण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू असतो. संस्कृतीविषयक प्रदीर्घ अभ्यासानंतर आपले काही महत्त्वाचे निष्कर्ष प्रसिद्ध करण्याचा त्यांचा विचार असतो, तेवढ्यात त्यांचा झालेला खून. असूर वरुणाची मूर्ती त्यात गायब होते.

प्रा. जोशी हे मूर्ती तस्करी करणारे म्हणूनही चर्चा सुरू होते. एक रहस्यकथाच सुरू होते आणि मग त्याचा शोध प्रा. जोशी यांची कन्या सायली तसेच तिचा मित्र गौतम कांबळे हे सुरू करतात. त्यांच्यासोबत त्यांचे पीएचडीचे तज्ज्ञ मार्गदर्शक डॉ. मुणगेवार हे आहेत. सायली-गौतम हे दोघेही संशोधकच. आणि या शोधाचा मागोवा म्हणजे हे नाट्य. त्यात हिंदू-मुस्लिमांवर भाष्य आहे, इतिहास आहे. संस्कृती रक्षणासाठी व वर्चस्वासाठी होणारा संघर्ष आहे. एका क्षणी या नाट्यातील थ्रिल-गूढता संपते आणि वैचारिक स्तरावर पोहचते.

संस्कृतीच्या अस्तित्वासाठी काही कर्मठांनी जुन्या संहिता लपविल्या, बाद ठरविल्या आणि आपले वर्चस्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आपण आपला भूतकाळ, पुराणकाळ तपासून घ्यावयास हवा. त्याचा शोध घेणे जरुरीचे आहे असं काहीदा एकूण कथानकातून मांडण्याचा प्रयत्न आहे. यातील वैचारिक संवाद काहीदा भडक व टोकाचे ठरतातः तर काहीदा हे एक 'थ्रिल'नाट्य म्हणूनही वाटते, पण दोन अंकात खिळवून ठेवणारे प्रायोगिक वैचारिक नाट्य म्हणून निश्‍चितच त्यात ताकद आहे.

मृणाल वरणकर यांनी सायलीची भूमिका समजून केली आहे. अभिनयाचं उत्तम अंग त्यांना आहे. प्रायोगिक रंगभूमीवरून आलेला नव्या पिढीचा अभ्यासू रंगकर्मी सुशील इनामदार याने गौतमची भूमिका सुरेख केली. मृणाल व सुशीलचं ट्यूनिंग चांगलं आहे. गौरव मालवणकर (प्रा. मुणगेकर), सुभाष लोखंडे (द्विवेदी), रवी बनकर (डीसीपी) यांच्याही भूमिका नाट्याला पूरक ठरतात. आशीष पाथरे यांनी शेवटच्या क्षणी प्रा. जोशी म्हणून लावलेली हजेरी लक्षात राहण्याजोगी. तांत्रिक अंगे नाट्याला साथसोबत करणारी. एकूणच टीमवर्क सर्वांगसुंदर, काहीसा जड विषयही दिग्दर्शक-लेखकाने कल्पकतेनं पेलला आहे. त्याला एक गती आहे.

महाराष्ट्रात बुद्धिवंतांच्या झालेल्या हत्यांशी या नाटकाचा संदर्भ कदाचित काही मंडळी लावतील, पण त्यात अर्थ नाही. एकूणच नाट्यातील विषयाची मांडणी व एक परिणामकारक नाट्य म्हणून असलेले सादरीकरण हे महत्त्वाचे आहे. यंदाच्या स्पर्धेतील विजेतेपदी पोहचलेले नाट्य म्हणून लक्षवेधी ठरत आहे.
असूरवेद
मूळ कादंबरी – संजय सोनवणी
नाट्य रूपांतर/दिग्दर्शन – सुनील हरिश्‍चंद्र
नेपथ्य – संदेश बेंद्रे
प्रकाश – राजेश पंडित/प्रशांत सावंत
संगीत – विशाल गोळे/कल्पेश पाटील
रंगभूषा – उदयराज तांगडी
वेशभूषा – समीर पेणकर
निर्मिती – महानगरपालिका कर्मचारी संघटना
संस्था – कलासाधना -

(दै. सामनामधील परिक्षण)

Thursday, June 2, 2016

[New post] Grim Legends 3 v1.0 (Full)

apkformods posted: "Grim Legends 3 v1.0 (Full)Requirements: Android 4.0.3+Overview: Step into the shoes of the Monster Hunter from the mysterious Order and save the city of Lichtenheim from a Nightmare coming from another dimension. Apprehend the thief of the powerful artifa"

[New post] Almug – Icon Pack v1.0.0

apkformods posted: "Almug – Icon Pack v1.0.0Requirements: 4.0.3+Overview: Vivid. Dark. Glow! Vivid icon pack, with amazing effects on dark inner glyphs and glow on icon borders. Quite appealing feel on your eyes. Ready to shine on your device. Welcome to something new"

[New post] LONE ELITE CM13/12 Theme v1.3.5

apkformods posted: "LONE ELITE CM13/12 Theme v1.3.5Requirements: 5.0 and upOverview: After the success of LONE CM12 / 13 (over 100.000 downloads!!) comes LONE ELITE an improved version of LONE with Arcus support How have the different colors of LONE ELITE: 1 –"